Monday, June 28, 2010

बंदिनी


अगदी जन्मापासून ते मृत्युपर्यंत स्त्रीच आयुष्य कोणाशी न कोणाशी जोडलेलं असत. लहानपणी ती कोणाची तरी मुलगी, बहिण मैत्रीण असते आणि लग्नानंतर कोणाचीतरी पत्नी, काकी, मामी,आत्या, मावशी मग आई, आजी अशी अनेक विशेषणे तिच्या नावापुढे लागतात. खरतर स्त्रीत्व हि दैवी देणगी आहे. आजची स्त्री हि सुशिक्षित, सुजन, कमवती आहे. तिला आपल्या हक्कांची, जबाबदारींची, कर्तव्यांची पूर्ण जाणीव आहे. आज ती सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसते आणि एवढेच नाही तर ती विनातक्रार तिचे घरही तेवढ्याच आनंदाने सांभाळते.

बदलत्या काळानुसार तिच्या आचार विचारात खूप बदल झाला आहे. पण बदलत्या काळानुसार समाजाच्या मानसिकतेत कितीसा बदल झाला आहे ? समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कितीसा बदलला आहे? तिच्या स्त्रीत्वाला जपणारे, तिच्या भावनांचा, विचारांचा सन्मान करणारे असे कितीसे लोक आहेत समाजात?
खरोखर विचारात पाडणारे प्रश्न आहेत हे ......

आजही मुलगी जन्माला येण काही खूप आनंददायी गोष्ट नाही आहे. काही खेड्यातून आजही जन्मापूर्वीच तिचा आवाज बंद करण्यात येतो. तिच्या शिक्षणावर खर्च करण हे काही प्रतिष्ठेच लक्षण मानल जात नाही कारण काय तर शेवटी तिला चूल आणि मुलंच सांभाळायच आहे. फक्त नावापुरत शिक्षण दिल जात कारण जेवढ जास्त शिक्षण तेवढी लग्नाच्या बाजारात तिची किंमत जास्त .....खरंच!! लग्नाच्या बाजारात तिची बोली लावली जाते...तिचं दिसण, तिचं शिक्षण, तिचा पगार, तिचं स्त्रीधन आणि काही ठिकाणी हुंडासुद्धा ....या सगळ्या दिव्यातून बाहेर पडल्यानंतरही आयुष्यभर नवऱ्याच्या अहंकाराला कधी कधी तिला नाहक बळी पडाव लागत. आजही काही ठिकाणी घरातल्या महत्वाच्या निर्णयात स्त्रीला सहभागी करून घेतलं जात नाही. समाजाला आजही तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची पुरेशी जाणीव नाही आहे.

समाजाच सोडा किती स्त्रियांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते? हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारावा ...
लहानपणी वडिलांचे आणि लग्नानंतर नवऱ्याचे नाव तिच्या नावापुढे लागते ...यात काही गैर नाही पण तिच्या स्वतंत्र नावाला कधी मान्यता मिळेल? जरासुद्धा तिने कोणाच्या मनाविरुद्ध, समाजाविरुद्ध आवाज उठवला तर आजही तिचा आवाज दडपला जातो. समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो. कधी समाज तिच्याकडे निकोप दृष्टीने पाहिलं ? कधी तो तिच्या आवाजाला न्याय देईल ? खरंच का तो तिच्या स्त्रीत्वाला जपतो? अशी एक न अनेक प्रश्न पडतात पण खरंच का कधी याची उत्तर मिळतील ?

खरचं आता गरज आहे स्त्रीने स्वतःचे बंदिनीचे स्वरूप बदलून सर्वांना आपल्यात सामावून घेण्याऱ्या, वाईट गोष्टींचा नाश करणाऱ्या रागिणीच रूप धारण करण्याची. तशी आजची स्त्री हि बंदिनी राहिली नाही आहे पण आजही परंपरेच्या नावाखाली तिचे पंख छाटले जातात...प्रेमाच्या गोंडस नावाखाली तिच्यावर बंधन लादली जातात .....त्यागाच्या नावावर तिचे सर्वस्व हिरावून घेतले जाते ... हे आता कुठेतरी थांबायला हवे. तिचा होणारा मानसिक त्रास कुठेतरी थांबायला हवं आणि यासाठी स्त्रियांनीच पुढे यायला हवे कारण एक स्त्रीच दुसर्या स्त्रीचे मन जास्त चांगल्या रीतीने ओळखू शकते. या पुरुष प्रधान समाजाकडून कोणत्याही अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्त्रियांनीच एकमेकींचे अस्तित्व जपावे आणि या समाजाच्या, परंपरेच्या बंधनात अडकलेल्या बंदिनीला तिच्या अस्तित्वाचे मोकळे आभाळ मिळवून दयावे.

कोमल .................................२८/६/१०

Sunday, June 13, 2010

निरुत्तर प्रश्न....


कधीकधी आपल्या हातात काहीच नसत..... कितीही प्रयत्न केला न तरीही हातात काहीच लागत नाही.
कितीही ठरवलं तरी काही गणित चुकतात अगदी आपल्याही नकळत ...आणि त्यांची उत्तरहि नाही सापडत.
आयुष्यातील काही प्रश्न असेच निरुत्तर राहतात ... आणि ज्यांना प्रश्न विचारायचे असतात ते ओळखही दाखवत नाहीत.
पण तरीही आपण आपल्या परीने उत्तर शोधायची असतात. गरजेपुरत का होईना ...आपल्याच समाधानासाठी तरी आपण आपली उत्तर शोधायची असतात.

जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काही न काही कारण असतात ...कधी कधी ती कारण कळत नाही आणि आपण सगळ्यांना त्याचा दोष देत बसतो ...साहजिक आहे म्हणा ... मनासारखं नाही झाल कि चिडचिड होते ....
पण 'जे होत ते आपल्या चांगल्यासाठी होत असतं हे कधी विसरू नका' .... त्या मागचीही उत्तर मिळतील ... नक्की मिळतील.... फक्त थोडी वाट बघा योग्य वेळेची ... मग तुम्हालाही पटेल आयुष्यात सगळीच उत्तर निरुत्तर नसतात त्या मागे कारण असतात कधी दृश्य तर कधी अदृश्य ... नाही का ?

कोमल ..................१४/५/१०

आठवणी ....


आठवणींच जग किती अदभूत असत न!! जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आपण त्या आठवून त्यात हरवून जातो.
कधी मनापासून हसतो तर कधी नकळत डोळेही भरून येतात. अशा कितीतरी आठवणी आपल्या सोबत असतात नाही... शाळेच्या , college च्या, मित्र - मैत्रिणींच्या , अचानक ठरलेल्या पिकनिकच्या, अगदी रागाच्या भरात मित्रांशी केलेल्या भांडणांच्याही अशा खूप काही आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतात तर काही आपण विसरण्याचा प्रयत्न करत असतो.

कधी पावसात भिजलेल्या आठवणी तर कधी थंडीत गोठलेल्या ..... उन्हात तापलेल्याही आठवणी असतात ज्या खूप चटके देऊन जातात. आठवणी या नाजूक हलक्या पावसांच्या सरीनसारख्या असतात अचानक येऊन भिजवून जातात. कधी भिजावं त्यात मनसोक्त अन नंतर कोरडही व्हावं.

पण उगाच त्यात गुंतून पडण्यात अर्थ नाही आणि योग्यही नाही . कधीतरी विरंगुळा म्हणून ठीक आहे. आपला भूतकाळ तर बदलण शक्य नाही पण म्हणून वर्तमान बिघडवू नये.
पण खरचं त्या कधीच विसरता येत नाही, त्या फक्त पुसट होतात काळाबरोबर....... नवीन आठवणींना पुरेशी जागा देण्यासाठी ....नाही का ?

आम्ही दोघी...

जगात दोन माणसांचे नशीब सारखे असते का? असं कधी होऊ शकत का? अहो , जगाच सोडा ... माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे... खूप जिवलग सखी... आमची काही फार जुनी ओळख नाही पण तरीही आमचं खूप जमत ... तशी ती माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठी असेल पण तरीही आमचे विचार खूप जुळतात.

का कुणास ठाऊक पण एकदा आम्ही खूप personal गोष्टी बोलत होतो आणि माझ्या लक्षात यायला लागल कि तिच्या काही गोष्टी, काही घटना माझ्याही आयुष्यात घडल्या आहेत आणि त्यातला काही आताही घडत आहे. सुरवातीला खूप विचित्र वाटलं पण नंतर खूप interesting वाटायला लागल. खरंच असं होऊ शकत का ? आपल्या सारखंच नशीब कुणाच असू शकत का ? तसं पाहायला गेलो तर आमचे विचारही जुळतात फरक इतकाच कि ती जास्तच emotional आहे माझ्याहीपेक्षा ....

सहजच बोलतानाहि आम्ही बोलून जातो 'अरे हे तर माझ्यासोबत घडलंय ...हा विचार माझा आहे' .....मग आम्ही दोघीही त्यावर जोरात हसायला लागतो.... अगदी रस्त्यातही हसायला लागतो आम्ही ....सगळी लोक आमच्या वेडेपणाकडे बघायला लागतात ...पण त्यांना काय माहित आम्ही आमच्याच नशिबावर हसतोय ....

आम्हाला तर आमच्यासारखं नशीब शोधायला जग पालथ घालाव नाही लागल ... तुम्हाला भेटलेय का असं कोणी तुमच्या अगदी जवळच ?

कोमल ....................१/६/१०

भाग 9

तो हाक मारत होता बहुतेक.... पण माझ लक्षच नव्हत सगळ जग थांबलंय आणि मी चालतेय असंच वाटत होत मला...पुढंच नीटस दिसतही नव्हत मला माझे डोळे भरून गेले होते ...

डोक्यात विचारांचं चक्र चालू होत ....सगळी नाती अशीच असतात अप्पलपोटी अन स्वार्थी...प्रत्येकाला आपल्याकडून काहीतरी हवच असत आणि त्यांना हव ते मिळाल , आपल काम संपल कि सगळे असेच जातात एकट करून....मला कळत नव्हते मी कुठे चालले होते ....बस चालत होते जसा रस्ता मिळेल तसा माझ्या तुटलेल्या विश्वासासोबत.....
मला आता दूर जायचं होत सगळ्या भासांपासून दूर .....नात्यांच्या मृगजळापासून खूप दूर .....

समाप्त

भाग 8

किती सहज बोलून गेलास रे ..... कि " विसरून जा मला , माझ्यासोबत काही फायदा नाही आहे तुझा ...."
" फायदा " तुला काय वाटतं मी फायदा म्हणून तुझ्यावर प्रेम करतेय ? प्रेम कोणी फायदा बघून नाही करत ? आणि मला तसं करायचं असत ना तर मी तुझ्या जवळ कधी आलेच नसते ..... तुझ्या जवळ काही नसतानाही मी तुझ्या सोबत होते कारण मला तुला मोठ होताना बघायचं होत आणि आज तुझ्या जवळ या गोष्टी आल्या तशी माझी गरज उरली नाही का तुला ? कि तुझ्या मनात कोणी दुसरीच .......
काळजात चर्र झालं माझ्या ... ठीक आहे जशी तुझी इच्छा ....मी फक्त एकदाच पाहिलं त्याच्याकडे रागाने....त्याची नजर अजूनही खालीच होती .....केवढा तरी राग आला होता मला खरंच वाटत नव्हत हाच का तो माणूस ज्याच्या सोबत मी भविष्याची स्वप्न रंगवली होती आणि आता हा मला अर्ध्या वाटेत सोडून जायला निघालाय....किती रे निष्ठुर आहे तुझ मन एकदाही मनात नाही आल माझ काय होईल....मी काहीच बोलले नाही त्याच पुढच explanation ऐकायला आता मला तिथे थांबायचं नव्हत मी तशीच निघाले तिथून ..........एकदाही मागे न वळून पाहता .....

भाग 7

आज मी खूप खुश होते ....त्याने स्वतःहूनच सकाळी मला फोन केला होता कि आज आपण भेटू का म्हणून ? मलाही त्याला भेटायचंच होत ....आम्ही रोजच्याच ठिकाणी भेटणार होतो....आमची नेहमीची जागा .....कितीतरी दिवसांपासून आमची वाट पाहत होती ...मस्त छान संध्याकाळ होती... शांत वातावरण ...हवेतही गारवा होता थोडा आणि त्यात लाटांचा आवाज ...फार छान वाटत होत मला ....

मी पोहचायच्या आधीच तो तिथे माझी वाट बघत उभा होता ...उगाचच थोडस मंद स्मित केल त्याने रोजच्या सारख नाही विचारल " का उशीर केलास म्हणून...." काहीच नाही बोलला बस !! मी आले तशी आम्ही थोड पुढे गेलो असचं चालत ....मग बसलो वाळूत. माहित नाही पण मला आज थोडं त्याच वागण काहीस वेगळ वाटत होत तो खूप शांत वाटत होता रोजच्यासारखा नाही बोलत होता आणि बसलाही माझ्या पासून थोडा दूर....मी सहजच बोलले ''आता मध्ये काय कोणाला झोपायला जागा ठेवली आहेस ?'' त्यावरही काहीच बोलला नाही ...नाहीतर माझ्या pj वर त्याची comment असायचीच....मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते पण तो माझ्या नजरेलाही नजर देत नव्हता ...नक्कीच त्याचं मनात काहीतरी चालू होत .....माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली....