Sunday, May 30, 2010

भाग 6

आजकाल आमच बोलण कमी झालय .... एकमेकांना फोन तर करतो पण काहीच बोलत नाही... दोघंही शांत असतो बराच वेळ .....काय झालंय काही कळतच नाही ...

आजकाल भेटतही नाही आम्ही... उगाच कारण देत बसतो तो .....खरचं वेळ नसतो कि त्याला आता भेटायचं नाही आहे ? स्वतःलाच प्रश्न विचारून ...स्वतःशीच बोलून कंटाळा आला आहे मला ...पण उत्तर काही सापडत नाही....का तो मला अस टाळतोय ? त्याला माझी जबाबदारी नाही घ्यायची आहे का? मला कस कळेल त्याच्या मनात काय चाललाय... कठीण आहे ...मला त्याला भेटायचं ...खूप काही सांगायचं आणि खूप काही विचारायचं आहे.....तो भेटेल कि नाही ? माहित नाही आणि भेटलाच तरी उत्तर देईल कि नाही ? हे हि नाही माहित .... त्याला माहिती आहे मला नाही आवडत खोट बोललेलं म्हणून कदाचित तो खरंही बोलत नसेल ......पण तरीही मला त्याला भेटायचं ...जाब विचारायचा आहे ... आतापर्यंत झालेल्या गोष्टींचा ....

भाग 5

खूप घुसमट होतेय रे... तुला समजून घेताना माझी खूप दमछाक होतेय ...कळतच नाही आहे नेमकं तुला काय हवंय ? तुझ्या मनात काय चाललंय ? का रे इतका विचित्र वागतोस? सगळच तुझ्या मनाप्रमाणे तर करतेय माझ्या घरातल्यांचा विरोध असतानाही.... तरीही का तू असा वागतोयस ?आता अजून काय हव आहे तुला ?

सांग, नाही का दिली मी तुला साथ प्रत्येक गोष्टीत ? तुला हव तेव्हा हव तिथे नसते का मी हजर ? कुठे कमी पडतेय रे मी ? का माझ प्रेम कुठे कमी पडतेय ? का आपला विश्वास कुठेतरी हरवत चाललाय ?

सांग ना , एवढ काय मागितलं मी तुझ्याकडे ? इतके दिवस आपण एकत्र घालवले, एकमेकांना सांभाळून घेतलं मग आता लग्नच वचन पूर्ण करायला एवढ का कचरतोयस ? विश्वास नाही आहे का तुझा माझ्यावर कि तुझा तुझ्यावरच ?

तुटतेय रे मी ... आतून पूर्णपणे तुटते जेव्हा तू या प्रश्नाला उत्तरच देत नाहीस . अजून किती वाट बघू रे... लोकांचे टोमणे ऐकून कान थकले माझे.... त्यांना बोलताही येत नाही काही कारण तूच काही बोलत नाही आहेस मग मी तरी कशी उत्तर देऊ त्यांना ? असह्य होतंय आता, सवय नाही आहे रे मनाची अशी घुसमट पहायची .....कठीण होतेय रे आता सार .....

Friday, May 14, 2010

भाग 4

आज ऑफिस मधून निघायला थोडा उशीरच झाला ....काय करणार आता pramotion झाल आहे न मग हे सगळ करावंच लागणार ... पण आजच होईल अस वाटल नव्हत ...खूप दमल्यासारख वाटत होत पण तरीही खूप खुश होते मी कधी एकदा त्याला सांगते असं झाल होत. मघाच पासून फोन करतेय ...पण सारखा त्याचा फोन waiting वर ....जराही काळजी वाटत नाही का त्याला माझी? मी कुठे असेन? कशी आहे ? मला उशीर का झाला? मी सारखा फोन का करतेय ? काहीच नाही का वाटत याला ?
मनात गोंधळ आणि डोक्यात विचारांचा नुसता गुंता झाला होता ....पण त्याने साधा मला एक call पण नाही केला. असा कसा हा ? काही कळतच नाही याच .....
जेव्हा त्याला गरज असते तेव्हा त्याला माझी आठवण येते ...मग अगदी मी कितीही बिझी का असेना ....दमलेली का असेना ...त्याच्याशी बोलायला हव... का? कारण त्याला गरज आहे माझी ... कोणीतरी समजून घेण्याची ....जगाशी भांडण करून येतो आणि मग माझ्याशीही वाद घालत बसतो तो कसा बरोबर आहे आणि ते कसे चुकले ....काहीही गरज नसताना उगाच एखाद्या गोष्टीचा डोंगर करण्याची सवयच आहे त्याची ....काहीही करा पण जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा मी तिथे कोणत्याही परिस्थितीत मी तिथे हजर हवी .....

आणि जेव्हा मला गरज असते तेव्हा ? तेव्हा याला वेळच नसतो ....कधी फोनच लागत नाही ....कधी balance च संपतो कधी battery off होते ....कधी फोन चुकून लागला तर तो बिझी असतो .... मग मी कुठे जाऊ ? कुणाला सांगू ? खरच रे माझ्या आयुष्यात काहीही घडल न अगदी चांगली नाहीतर वाईट ..पण मला सगळ्यात आधी तुझी आठवण येते कधी एकदा तुला सांगते असं होऊन जात... आणि तू !! तू तर तेव्हा कुठेच नसतोस ..... खरच रे जेव्हा मला खरंच तुझी असते न तेव्हा तू कुठेच नसतोस... मी खूप एकटी होऊन जाते रे... मला तेव्हा कुणीतरी हव असत रे आपल ...माझ हक्काचं माणूस ... पण तू नसतोस ....
खूप भरून येते रे तेव्हा मला असं वाटत मी खूप एकटी आहे ....माझं असं कुणीच नाही... मागेही मला बर नव्हत , मला बोलायलाही जमत नव्हत मी दिवसभर call केला नाही तर तुही नाही केलास...एकदाही माझी विचारपूस करावीशी नाही वाटली कि मी कशी आहे? मी काय करतेय? त्या दिवशी तर मला अगदी भरून आलं होत ...अगदी अचानक आभाळ भरून आल्या सारखं....

आज पण तेच झाल..... मला तुला आनंदाची बातमी सांगायची होती आणि तुला वेळच नाही आहे माझ्याशी बोलायला आणि साधी माझी विचारपूस करायलाही ....मी खरंच इतके परकी आहे का रे तुला? माझा प्रश्न मलाच नेहमी निरूत्तर करतो ...आणि मी फक्त डोळे भरून वाट बघत असते ..... तुझ्या फोनची...... तेवढ्याच आतुरतेने .........

Saturday, May 8, 2010

भाग 3

आज तो ओरडला माझ्यावर .....ओरडला कसला खेकसलाच ....'झाल तुझ पकवून .... अजून किती lecture देशील बाई...तुझी अक्कल तुझ्याच जवळ ठेव ..मला नको शिकवूस शहाणपण ... अतिशहाणी झालीस न आता ...जास्त काळात तुला गरजेपेक्षा जास्त ...बिनडोक कुठची ....'
लागले हे शब्द मला.....खरतर खूप टोचलेच ...गप्पच बसले मी ...

हा तोच न ...ज्याला आधी माझ बोलण आवडायचं ..पटायचं ...आणि आता त्याला मी अतिशहाणी वाटतेय ...त्याचे कितीतरी problems मी सहज सोडवले आहेत आणि आता मी त्याला बिनडोक वाटतेय ...स्वतः नीट विचार करू शकत नाही मग माझ्यावर का ओरडतोय ? मी काही चुकीच बोलले का ? उगाच जबरदस्ती shopping करायला लावत होता ....

'ड्रेस घे, नाहीतर bag नाहीतर निदान चप्पल तरी'... फक्त एवढंच तर बोलले
'मला आता काही नको आहे...उगाच का पैसे खर्च करतोयस ....जरा ठेव सांभाळून उद्या आपल्याच उपयोगी येतील कारण मला ठावूक आहे उद्या जेव्हा आपल्या घरातले तयार नाही होणार न...तेव्हा हेच पैसे आपल्या उपयोगी येतील ...आणि मला लागल तर मी घेईन रे मागून ....कशाला आता हि जबरदस्ती ...ते ठेव थोडे तुझ्यासाठी आणि उगाच नसत्या पार्ट्या आणि त्या timepass मित्रांवर पैसे खर्च करू नकोस गरज नसताना ...'

तर राग आला त्याला म्हणे 'जास्त कळत न तुला आता माझ्यापेक्षा, मला तर अक्कलच नाही आहे . जास्त शिकवू नकोस मला. ठाऊक आहे मला कुठे आणि कशावर खर्च करायचा ते .... आणि माझ्या मित्रांबद्दल काहीही बोललेले मला चालणार नाही ..माझी मर्जी मी कधीहि कुणालाही party देईन तुला काय करायचं ...माझ्या गोष्टीत पडू नकोस..'

ह्याची गोष्ट ? मग माझी काय ? तुझ्या आणि माझ्या गोष्टी काही वेगळ्या आहेत का ?
काही बोललेच नाही मी ....गप्पच बसले होते ....स्वतःशीच बोलत ....

Thursday, May 6, 2010

भाग 2

काल खूप दिवसांनी भेटलो आम्ही. किती छान वाटत होत. आम्ही मस्त movie ला गेलो होतो कॉर्नर सीट .... अंधारात त्याने सहज माझ्या खांद्यावर हात टाकला . आधी मी गडबडून गेले ...मग थोडी स्थिर झाले. त्याने मला अजून जवळ घेण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मनात एक विचार आला ....ज्याच्यासाठी मी हे सगळ करतेय त्याला त्याची जाणीव खरीच आहे का ?

आज दोन वर्ष झाली मी घरातल्यानविरुद्ध उभे आहे त्याच्यासाठी. पण आमच लग्न? ते खरंच होणार आहे का कधी ?
विचारांनीच मन शहारून गेल .... अन अचानक माझी तंद्री भंग झाली. त्याने मला दूर लोटलं आणि तो चिडला माझ्यावर ' आपण इतक्या दिवसांनी भेटलोय तुला काहीच कसं वाटत नाही ...दुसरी एखादी असती तर माझ्या मिठीत कधीच विरघळली असती ...तुझ्या स्पर्शात तर काहीच जाणवत नाही मला. मी आवडत नाही का तुला ?' मी पुन्हा स्थब्ध ....आता कस सांगू याला माझ्या मनात काय चाललाय?
'दोन वर्ष झाली बघतोय तू कधी स्वतःहून हातही नाही पकडलास मग मिठीत येण तर दूरची गोष्ट आहे ...तू इतर मुलींसारखी नाही आहेस ...बघ जरा त्यांच्याकडे त्या बघ कशा त्यांच्या bf ला मिठी मारतात ...तुला नाही का वाटत त्यांच्यासारख करावस ? जराही मुलींची लक्षण नाही तुझ्यात...बिनडोक कुठची ...'

खूप लागले रे मनाला हे सार ... खरचं मला नाही का वाटत हे सगळ करावस ? मलाही वाटत रे , मलाही हव असत हे सगळ ... अशी भावनिक गुंतवणूक , शारीरिक जवळीक .....पण !! पण भीती वाटते रे मला ....उद्या आपलं लग्न झाल नाही तर याचा त्रास होईल रे मला ...तुम्हा मुलाचं काय ..सहज विसराल ....पण माझ ? मी तुझ्या शिवाय कधी कोणाचाही विचार करू शकत नाही ...इतक्या मुलांशी बोलते मी , मस्ती करते पण तुझी जागा खूप खास आहे रे इतरांपेक्षा वेगळी ...जी मी कधी कुणाला नाही देऊ शकत ...मी नाही कधी तुला माझ्या मित्रांसोबत compaire केल ...पण तू...तू तर माझीच जागा दाखवून दिलीस रे मला ....

मी आतापर्यंत तुझे सारे हट्ट, तुझे रुसवे , फुगवे ....सार सार काही पाहिलं ...हे खर तर मला करायला हव होत रे ....पण तुला सांभाळायच काम तर मीच करतेय ....
मला नाही का वाटत ....माझ्यावरही कुणीतरी जीवापाड प्रेम करावं ...माझ्यासाठी त्याने धावत याव ...माझे लाड करावे, माझे हट्ट पुरवावे....पण इथे तर सगळ उलटंच आहे. मला तर असं काहीच वाटत नाही कि माझ्या भावनांची साधी दखलही घेतली जाते ...मला काय हवाय ..काय नकोय ...
साधी विचारपूसही नाही...किती हा कोरडेपणा भावनांचा ..

मग आता तूच संग मी कशी येऊ रे तुझ्या जवळ ?
तुला तर माझ मनही अजून नीटस जाणता येत नाही ...
जिथे भावनिक गुंतवणूकच नाही होत आहे तिथे शारीरिक जवळीक तरी कशी होईल ?
सांग ना तूच सांग मला ....
किती बोलले मी पण फक्त मनात ...माझा धीरच झाला नाही त्याला काही बोलायला ....
फक्त डोळे भरून आले...आणि मनही...

मृगजळ .... एक भास आपलेपणाचा ..भाग 1

किती सहज बोलून गेला तो 'जरा आरशात बघ स्वतःला.... कशी दिसतेयस .... जरा नीट राहत जा इतर मुलींसारखी. किती जाडी दिसतेयस... आधी किती छान दिसायचीस .फक्त तुझ्याकडे पाहत रहावसे वाटायचे मला आणि आता माझे लक्ष दुसऱ्या मुलींकडे सहज जाते. तुला नाही आवडत आजकाल बघायला.'

हे ऐकून मी स्तब्धच झाले ...काय बोलावं सुचेना ...मला तर काय reaction द्यावी हे हि कळत नव्हते . मी काहीच न बोलता घरी निघून आले आणि उगाच आरशासमोर जाऊन उभी राहिले ...खरंच काय मी इतकी वाईट दिसते ? हा !! आजकाल मला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो रोजच्या गडबडीत ....पण म्हणून काय त्याने अस बोलावं ?
नकळत माझे डोळे भरून आले ....

तो हि खूप बारीक होता मी कधी त्याला बोलले नाही असं ... तो जसा आहे तसाच मला आवडतो ...
एखाद्याची उंची, जाडी, रंग, रूप का कोणाच्या हातात असते ? ते तर देवाने आपल्यासाठी ठरवून दिले आहे तसे आपण दिसतो ...मग त्याचे माझ्यावर प्रेम आहे कि माझ्या शरीरावर ?

हा तोच होता ना जो आधी माझी सौंदर्याची स्तुती करायचा, ज्याला आधी माझ दिसण, वावरणं आवडायचं ... आणि आज त्यालाच मी कशीतरी दिसतेय , माझ्याकडे बघवत नाही त्याला ...खरंच का मी इतकी वाईट आहे ?
माझ्यासोबत चालायलाहि त्याला लाज वाटत होती ....सारखा मागे नाहीतर पुढे चालत होता ...
आज याला माझ्यासोबत दोन पावलं चालायला लाज वाटतेय ...उद्या सात जन्म काय आणि कसा चालणार हा माझ्यासोबत ?
आपल्या जोडीदाराची लाज वाटते अशा माणसासोबत मला संसार करायचाय ... कसा करू मी ?
माझी पावलं तिथेच घुटमळली होती ....

Tuesday, May 4, 2010

पाऊलखुणा.........




समुद्रकिनारी ओल्या वाळूतल्या चिमुकल्या खेकड्यांनी ओढलेल्या रेघोट्या पहिल्या, कि मनाला एक प्रश्न पडतो....
आपणसुद्धा उमटवू शकतो का आपल्या आयुष्याच्या वाळूवर आपल्या अस्तित्वाचे ठसे?
कदाचित उमटतीलहि...पण ते ठसे कितपत टिकतील कोण जाणे?

जीवनाच्या वाळूवर ठसा उमटवायचा असेल तर पाऊल दमदार आणि ठाम हवं, आत्मविश्वासाने टाकलेलं !!
जमिनीचा भक्कम आधार घेऊन नेटाने पुढे जाणार हवं, परिस्थितीशी झगडून मार्ग काढणार असावं!!

तरच उमटेल वाळूवर आपला ठसा.... आपली निशाणी मागे राहील .....
चवड्यांवर चालणार्या माणसांचे ठसे उमटत नाहीत कारण त्यांच्या पावलात आत्मविश्वास नसतो.
त्यांच्या जगण्यात दमदारपणा नसतो. ते चालतात पण त्यांची दखल घेतली जात नाही ...
मला माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा जीवनाच्या वाळूवर मागे ठेवायला आवडेल .... त्या चिमुकल्या खेकड्यानसारख्या.....
आणि तुम्हाला?

कोमल .....................४/५/१०

प्रेम !!


प्रेम !! फक्त दोनच शब्द पण किती अर्थपूर्ण !
एवढ्या छोट्याश्या शब्दात किती भावना लपल्या आहेत... प्रेम ठरवून नाही करता येत ते बस होऊन जात...अगदी आपल्याही नकळत.... आयुष्य अस बेधुंद होऊन जगत असताना ते कधी आपल्या मनाचा दरवाजा उघडून हळूच चोर पावलानेआत प्रवेश करते काळातही नाही !!

प्रेम माणसाला खऱ्या अर्थाने माणसात आणते. अगदी पहाडासारख्या माणसालाही ते रडवू शकते एवढी ताकद आहे प्रेमामध्ये. असं म्हणतात कि प्रेम आंधळ असते पण माझा विश्वास आहे कि जर ते डोळसपणे केले तर त्याच्याइतकी सुंदर गोष्ट जगात नाही आहे.

प्रेम जितके देऊ तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला परत मिळते. आईचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम, कसलीही अपेक्षा न ठेवता एखाद्यावर सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती, लहान मुलांचे निरागस प्रेम यांच्याइतके निस्वार्थ प्रेम असूच शकत नाही.

आजकाल करीयरच्या मागे धावणाऱ्या पिढीला प्रेम, भावना, माणुसकी, आपुलकी, जिव्हाळा यासारख्या गोष्टी जपायला वेळच नसतो.मान्य आहे कि आज प्रत्येक गोष्टीसाठी पैसे गरजेचे आहेत पण तरीही जगातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सुख आणि प्रेमसुद्धा पैशाने विकत नाही मिळत.
नाही का?

कोमल .........................४/५/१०

Monday, May 3, 2010

प्रश्न ....

लहान मुलांना जसे प्रश्न पडतात न अगदी तसेच प्रश्न किंबहुना जरा जास्तच प्रश्न मला आजही पडतात .
विचित्र वाटेल तुम्हाला वाचून पण खरंच कधी कधी अगदी डोक फुटायचीही वेळ येते ....
का वागतात लोक अस विचित्र ? मग मला का वागता येत नाही?
मी प्रयत्नहि करून पाहिला पण मला त्याचा त्रासच जास्त झाला. कस वागू शकतात लोक अशी?
आजकाल तर रक्ताच्या नात्यानमध्येही लोक औपचारिकता आणतात, कस जमत यांना इतक स्वार्थी विचार करायला?

लोक तर प्रत्येक गोष्टीत फायदा बघत असतात. मान्य आहे ती काळाची गरज आहे पण भावनांमध्येही?
माणस इतकी भावनाशुन्य कशी होऊ शकतात?
आई.... मुलांना सांभाळताना , मोठ करताना कधी फायदा बघत नाही.
ती असा विचार नाही करत कि उद्या माझा मुलगा मला सांभाळेल कि नाही ? माझ्याशी कसा वागेल ?
ती या सगळ्या गोष्टी फक्त कर्तव्यभावनेने आणि प्रेमाने करत असते अगदी सहज ...
तरीही तोच मुलगा त्या आईला मोठा झाल्यावर ' ते तर तुझे कर्तव्यच होते , तुला करायलाच हवे होते '
असं बोलून तिच्या प्रेमाचा अपमान करायलाही मागे पुढे नाही बघत.
बाबांनाही उलट बोलायला ते कमी नाही करत. ज्या माणसाने आयुष्यभर त्यांच्यासाठी खस्ता खाल्या त्यालाच वर सुनावतात ' अहो तुम्ही तर आम्हाला काहीच दिले नाही , तेव्हा जास्त शहाणपणा शिकवू नका ' अस बोलायलाही कमी नाही करत. कस वागू शकतात ते असे? लाज नाही वाटत त्यांना अस बोलायला?

जगात सध्या प्रेम, विश्वास, आपलेपणा यासारख्या भावनांना काही किंमत नाही आहे.
खरंच आयुष्य फक्त प्रेमावर नाही जगता येत पैसेसुद्धा तेवढेच गरजेचे असतात.
पण या नश्वर पैशांसाठी स्वतःच्या माणसांना, इच्छेला, प्रेमाला त्यागाच्या गोंडस नावाखाली बळी का दिला जातो?
आयुष्यात सगळ्या गोष्टी काही पैशाने विकत नाही घेता येत.
उद्या तुमच्याजवळ फक्त पैसा असेल पण हक्काची माणसच नसतील तर जगू शकता तुम्ही? कस जगणार?
जगण्यासाठी जस अन्न, हवा, पाणी यांची गरज असते ना तेवढीच किंबहुना
जरा जास्तच प्रेम, विश्वास, आधार आणि आपल्या माणसांची गरज असते.
नाही का ?

कोमल .........................३/५/१०

आयुष्य....


आयुष्य हे समुद्रासारखं असते खोल अन अथांग .
ते जितके वरून सुंदर दिसते त्याहीपेक्षा ते आतून जास्त सुंदर भासते .
मग ते सौंदर्य अनुभवण्यासाठी मी त्यात गुदमरून, बुडून मेले तरी चालेल
कारण मी ते सौंदर्य अनुभवले याचे मला समाधान असेल.
आणि तसेही मला समुद्राचे वेड आहे ...

आयुष्य खूप छोट असते नाही ...
त्यामुळे जितके देता येईल तितके दयावे.
देण्यासाठी फक्त पैसेच असतात का ? याही पेक्षा मौल्यवान असे प्रेम, आनंद,
हास्य, आपलेपणा ,सुख दयावे ....त्यांना पैसेही मोजावे लागत नाहीत.
कारण आयुष्यात जेवढ तुम्ही दयाल तेवढ्याच प्रमाणात किंबहुना दुप्पट प्रमाणात परत मिळवाल.
तेव्हा जेवढ चांगल देता येईल तेवढ देत रहाव.

शेवटी हा निसर्ग नियम आहे ..."जे दयाल तेच परत मिळवाल "
तेव्हा तुम्हीच ठरवा तुम्हाला काय हवंय.....
मला तर नेहमीच चांगल्या गोष्टी हव्या असतात ...
स्वार्थ म्हणा हवा तर माझा .....

कोमल .......................३/५/१०

निर्भय...


कुठेतरी वाचलं होत ...
" जिथे भीती असते , तिथे प्रीती नसते
अन जिथे प्रीती असते ,तिथे भीती नसते "

भीती म्हणजे नकारात्मक बाबींची अंधार कोठडी असते .
निर्भयता हि स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे .
भय हा सदगुणांच्या वाटेवरचा अडथळा आहे .
चुका करताना लाज वाटत नाही मग चांगल्या गोष्टी करताना कसली भीती वाटते?
'ज्याला गवताची भीती वाटते त्याने हिरवळीवर झोपू नये
अन ज्याला पाण्याची भीती वाटते त्याने पावसातहि भिजू नये '

किती दिवस दूर पळणार अस स्वतःच्या भीतीपासून आणि कुठे ?
कधी न कधी त्याला समोर तर जायचंच आहे, मग आजच का नाही ?
बिनधास्त सामोरे जायला हवं स्वतःच्या भीतीला ...मग बघ कस वाटते ते .

विसरू नकोस भित्रे लोक मृत्युपूर्वी अनेकदा मरतात,
अन शूर लोक एकदाच मृत्यूला आपलसं करतात
निर्भय माणूस वादळाच्या कुळातला असतो
आणि मला वादळ बनायचं घोंगावणार ......

कोमल ..................३/५/१०

मैत्री ....


हृदयाच्या झऱ्यातून वाहणाऱ्या या प्रेमरूपी पाण्याचा निखळ खळखळाट म्हणजे मैत्री
आपला पाय घसरला असता तोल सावरण्यासाठी एखाद्या खांद्यावर आपण
मोठ्या विश्वासाने हात ठेवतो तो खांदा म्हणजे मैत्री
दुःख हलक होईपर्यंत मनापासून गळ्यात पडून रडता येत तो आधार म्हणजे मैत्री
काहीही न मागता जो सर्वकाही देतो चार गोष्टी सुनवूनच तो आवाज म्हणजे मैत्री
आपल्या अश्रूंनी ज्याच्या डोळ्यातील आसवं लपत नाही तो अश्रू म्हणजे मैत्री
अनोळखी नात्यांमधूनही जे ओळखीचे नाते असते ते म्हणजे मैत्री

कोमल .................३/५/१०