Tuesday, May 4, 2010

पाऊलखुणा.........




समुद्रकिनारी ओल्या वाळूतल्या चिमुकल्या खेकड्यांनी ओढलेल्या रेघोट्या पहिल्या, कि मनाला एक प्रश्न पडतो....
आपणसुद्धा उमटवू शकतो का आपल्या आयुष्याच्या वाळूवर आपल्या अस्तित्वाचे ठसे?
कदाचित उमटतीलहि...पण ते ठसे कितपत टिकतील कोण जाणे?

जीवनाच्या वाळूवर ठसा उमटवायचा असेल तर पाऊल दमदार आणि ठाम हवं, आत्मविश्वासाने टाकलेलं !!
जमिनीचा भक्कम आधार घेऊन नेटाने पुढे जाणार हवं, परिस्थितीशी झगडून मार्ग काढणार असावं!!

तरच उमटेल वाळूवर आपला ठसा.... आपली निशाणी मागे राहील .....
चवड्यांवर चालणार्या माणसांचे ठसे उमटत नाहीत कारण त्यांच्या पावलात आत्मविश्वास नसतो.
त्यांच्या जगण्यात दमदारपणा नसतो. ते चालतात पण त्यांची दखल घेतली जात नाही ...
मला माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा जीवनाच्या वाळूवर मागे ठेवायला आवडेल .... त्या चिमुकल्या खेकड्यानसारख्या.....
आणि तुम्हाला?

कोमल .....................४/५/१०

No comments:

Post a Comment