Monday, May 3, 2010

निर्भय...


कुठेतरी वाचलं होत ...
" जिथे भीती असते , तिथे प्रीती नसते
अन जिथे प्रीती असते ,तिथे भीती नसते "

भीती म्हणजे नकारात्मक बाबींची अंधार कोठडी असते .
निर्भयता हि स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे .
भय हा सदगुणांच्या वाटेवरचा अडथळा आहे .
चुका करताना लाज वाटत नाही मग चांगल्या गोष्टी करताना कसली भीती वाटते?
'ज्याला गवताची भीती वाटते त्याने हिरवळीवर झोपू नये
अन ज्याला पाण्याची भीती वाटते त्याने पावसातहि भिजू नये '

किती दिवस दूर पळणार अस स्वतःच्या भीतीपासून आणि कुठे ?
कधी न कधी त्याला समोर तर जायचंच आहे, मग आजच का नाही ?
बिनधास्त सामोरे जायला हवं स्वतःच्या भीतीला ...मग बघ कस वाटते ते .

विसरू नकोस भित्रे लोक मृत्युपूर्वी अनेकदा मरतात,
अन शूर लोक एकदाच मृत्यूला आपलसं करतात
निर्भय माणूस वादळाच्या कुळातला असतो
आणि मला वादळ बनायचं घोंगावणार ......

कोमल ..................३/५/१०

No comments:

Post a Comment