Sunday, May 30, 2010

भाग 5

खूप घुसमट होतेय रे... तुला समजून घेताना माझी खूप दमछाक होतेय ...कळतच नाही आहे नेमकं तुला काय हवंय ? तुझ्या मनात काय चाललंय ? का रे इतका विचित्र वागतोस? सगळच तुझ्या मनाप्रमाणे तर करतेय माझ्या घरातल्यांचा विरोध असतानाही.... तरीही का तू असा वागतोयस ?आता अजून काय हव आहे तुला ?

सांग, नाही का दिली मी तुला साथ प्रत्येक गोष्टीत ? तुला हव तेव्हा हव तिथे नसते का मी हजर ? कुठे कमी पडतेय रे मी ? का माझ प्रेम कुठे कमी पडतेय ? का आपला विश्वास कुठेतरी हरवत चाललाय ?

सांग ना , एवढ काय मागितलं मी तुझ्याकडे ? इतके दिवस आपण एकत्र घालवले, एकमेकांना सांभाळून घेतलं मग आता लग्नच वचन पूर्ण करायला एवढ का कचरतोयस ? विश्वास नाही आहे का तुझा माझ्यावर कि तुझा तुझ्यावरच ?

तुटतेय रे मी ... आतून पूर्णपणे तुटते जेव्हा तू या प्रश्नाला उत्तरच देत नाहीस . अजून किती वाट बघू रे... लोकांचे टोमणे ऐकून कान थकले माझे.... त्यांना बोलताही येत नाही काही कारण तूच काही बोलत नाही आहेस मग मी तरी कशी उत्तर देऊ त्यांना ? असह्य होतंय आता, सवय नाही आहे रे मनाची अशी घुसमट पहायची .....कठीण होतेय रे आता सार .....

No comments:

Post a Comment