Monday, May 3, 2010

प्रश्न ....

लहान मुलांना जसे प्रश्न पडतात न अगदी तसेच प्रश्न किंबहुना जरा जास्तच प्रश्न मला आजही पडतात .
विचित्र वाटेल तुम्हाला वाचून पण खरंच कधी कधी अगदी डोक फुटायचीही वेळ येते ....
का वागतात लोक अस विचित्र ? मग मला का वागता येत नाही?
मी प्रयत्नहि करून पाहिला पण मला त्याचा त्रासच जास्त झाला. कस वागू शकतात लोक अशी?
आजकाल तर रक्ताच्या नात्यानमध्येही लोक औपचारिकता आणतात, कस जमत यांना इतक स्वार्थी विचार करायला?

लोक तर प्रत्येक गोष्टीत फायदा बघत असतात. मान्य आहे ती काळाची गरज आहे पण भावनांमध्येही?
माणस इतकी भावनाशुन्य कशी होऊ शकतात?
आई.... मुलांना सांभाळताना , मोठ करताना कधी फायदा बघत नाही.
ती असा विचार नाही करत कि उद्या माझा मुलगा मला सांभाळेल कि नाही ? माझ्याशी कसा वागेल ?
ती या सगळ्या गोष्टी फक्त कर्तव्यभावनेने आणि प्रेमाने करत असते अगदी सहज ...
तरीही तोच मुलगा त्या आईला मोठा झाल्यावर ' ते तर तुझे कर्तव्यच होते , तुला करायलाच हवे होते '
असं बोलून तिच्या प्रेमाचा अपमान करायलाही मागे पुढे नाही बघत.
बाबांनाही उलट बोलायला ते कमी नाही करत. ज्या माणसाने आयुष्यभर त्यांच्यासाठी खस्ता खाल्या त्यालाच वर सुनावतात ' अहो तुम्ही तर आम्हाला काहीच दिले नाही , तेव्हा जास्त शहाणपणा शिकवू नका ' अस बोलायलाही कमी नाही करत. कस वागू शकतात ते असे? लाज नाही वाटत त्यांना अस बोलायला?

जगात सध्या प्रेम, विश्वास, आपलेपणा यासारख्या भावनांना काही किंमत नाही आहे.
खरंच आयुष्य फक्त प्रेमावर नाही जगता येत पैसेसुद्धा तेवढेच गरजेचे असतात.
पण या नश्वर पैशांसाठी स्वतःच्या माणसांना, इच्छेला, प्रेमाला त्यागाच्या गोंडस नावाखाली बळी का दिला जातो?
आयुष्यात सगळ्या गोष्टी काही पैशाने विकत नाही घेता येत.
उद्या तुमच्याजवळ फक्त पैसा असेल पण हक्काची माणसच नसतील तर जगू शकता तुम्ही? कस जगणार?
जगण्यासाठी जस अन्न, हवा, पाणी यांची गरज असते ना तेवढीच किंबहुना
जरा जास्तच प्रेम, विश्वास, आधार आणि आपल्या माणसांची गरज असते.
नाही का ?

कोमल .........................३/५/१०

No comments:

Post a Comment