Tuesday, May 4, 2010

प्रेम !!


प्रेम !! फक्त दोनच शब्द पण किती अर्थपूर्ण !
एवढ्या छोट्याश्या शब्दात किती भावना लपल्या आहेत... प्रेम ठरवून नाही करता येत ते बस होऊन जात...अगदी आपल्याही नकळत.... आयुष्य अस बेधुंद होऊन जगत असताना ते कधी आपल्या मनाचा दरवाजा उघडून हळूच चोर पावलानेआत प्रवेश करते काळातही नाही !!

प्रेम माणसाला खऱ्या अर्थाने माणसात आणते. अगदी पहाडासारख्या माणसालाही ते रडवू शकते एवढी ताकद आहे प्रेमामध्ये. असं म्हणतात कि प्रेम आंधळ असते पण माझा विश्वास आहे कि जर ते डोळसपणे केले तर त्याच्याइतकी सुंदर गोष्ट जगात नाही आहे.

प्रेम जितके देऊ तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला परत मिळते. आईचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम, कसलीही अपेक्षा न ठेवता एखाद्यावर सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती, लहान मुलांचे निरागस प्रेम यांच्याइतके निस्वार्थ प्रेम असूच शकत नाही.

आजकाल करीयरच्या मागे धावणाऱ्या पिढीला प्रेम, भावना, माणुसकी, आपुलकी, जिव्हाळा यासारख्या गोष्टी जपायला वेळच नसतो.मान्य आहे कि आज प्रत्येक गोष्टीसाठी पैसे गरजेचे आहेत पण तरीही जगातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सुख आणि प्रेमसुद्धा पैशाने विकत नाही मिळत.
नाही का?

कोमल .........................४/५/१०

No comments:

Post a Comment